संगमनेर : तालुक्यातील आंबीदुमाला येथील कोटमारा धरणातून अवैधरित्या पाणीउपसा सुरूच आहे. शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात मोहीम हाती घेत धरणात टाकण्यात आलेले शेतीचे वीजपंप ताब्यात घेतले.
संगमनेर तालुक्यातील आंबी-दुमाला येथील कोटमारा धरणातून शेतीसाठी होणारा अवैध्य पाणी उपसा थांबवावा अशी मागणी बोटा येथील युवकांनी केली होती. सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी साठ्याने तळ गाठताच कारवाई सत्र आरंभिले आहे.

शनिवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाया करताना अनधिकृतपणे पाणी वापरासाठी धरणात टाकलेले बारा वीज पंप जप्त केले.
कोटमारा धरणाची क्षमता १५५ दशलक्ष घनफूट असून आज या धरणात केवळ ५ दशलक्ष घनफूटएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील बोटा, कुरकुटवाडी, आंबी-दुमाला या गावांच्या पाणी योजनांचा पाणी पुरवठा या धरणावर अवलंबून आहे.
आगामी काळात धरणातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जावा यादृष्टीने नियोजन सुरु आहे.
उपलब्ध व मृत पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या गावांसाठी उर्वरित पाणी राखीव ठेवण्याची गरज आहे. धरणातील पाणीसाठा १०-१५ दिवस पुरेल. पाणी चोरी सुरु राहिली तर सात दिवसात हे पाणी संपण्याची शक्यता आहे.
उन्हाळात होणाऱ्या पाणीचोरीशिवाय पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होत आहे. धरणात सध्या २ ते ३ टक्के पाणी साठा शिल्लक असून पाटबंधारे विभागाने गांभीर्याने कारवाई करणे आवश्यक आहे.
- हापुस आंब्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण ! आता डझनभर आंबे मिळणार फक्त ‘इतक्या’ रुपयात ! वाचा सविस्तर
- Ahilyanagar Politics : ॲड.प्रताप ढाकणे करणार भाजपमध्ये प्रवेश ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राजकीय चर्चांना उधाण
- अहिल्यानगर महानगरपालिकेत ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती, सामाजिक आरक्षण निश्चित तर लवकरच होणार भरतीला सुरुवात
- सीना नदी घेणार मोकळा श्वास!, नदीत सोडला जाणारा मैला पाईपद्वारे जाणार एसटीपी प्रकल्पात तर प्रकिया केलेले पाणी वापरले जाणार शेतीसाठी
- शेतकऱ्यांसाठी मुळा आणि निळवंडे धरणातून पाण्याचं काटेकोर नियोजन, यंदा महिनाभर अगोदर निळवंडे धरणातून सोडलं आवर्तन