अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- NAALCO Share Price: 1 महिन्यात नाल्कोने दिले 15.05% रिटर्न…आज कमावण्याची संधी
- TCS Share Price: टीसीएस शेअरची किंमत वधारली! गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी…बघा परफॉर्मन्स
- BEL Share Price: संरक्षण क्षेत्रातील ‘या’ शेअरमध्ये कमाईची संधी? टार्गेट प्राईस आणि रेटिंग अपडेट
- JP Power Share Price: 3 महिन्यात 19.43% तेजी! 20 रुपयेपेक्षा कमी किमतीचा स्टॉक आज तेजीत…बघा अपडेट
- RVNL Share Price: RVNL शेअर करिता पुढील टार्गेट प्राइस जाहीर! SELL करावा की HOLD?