अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- Maruti Suzuki Grand Vitara आता झाली 7 Seater ! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
- Realme GT 6 वर जबरदस्त ऑफर फ्लिपकार्ट सेलमध्ये 120W चार्जिंग आणि 50MP कॅमेरा फोन स्वस्तात
- Best Gaming Laptop : 2025 मधील सर्वात पॉवरफुल गेमिंग लॅपटॉप i9 प्रोसेसर आणि जबरदस्त बॅटरी बॅकअप
- सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 25 फेब्रुवारीचे 10 ग्रॅम सोन्याचे दर कसे आहेत ? मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगावसह तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या
- Simple One इलेक्ट्रिक स्कूटर 248 किमीच्या जबरदस्त रेंजसह लाँच – किंमत आणि फीचर्स जाणून घ्या