अहमदनगर :- भाजपचे सुजय (दादा) विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम (भय्या) जगताप यांच्यात झालेल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आता तर निकालाच्या दोन दिवस आधीच दादा आणि भय्या यांच्यावर लाखो रुपयांचा सट्टा लागला आहे. दादा आणि भय्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहेच.

शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यात कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
मात्र, तोपर्यंत जिल्हाभरातील मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. निकालासाठी अवघे काही तास उरलेले आहेत.
बुधवारी दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. गावागावात, चौकाचौकात, कॉलेज कट्टे एवढेच नाही, तर घरोघरी निकालावर चर्चा झडत आहेत.
अनेकांनी पैंज लावलेली आहे. कुणी पार्टी देण्याची, तर कुणी रोख रक्कम देण्याची पैंज लावलेली आहे. शेवटचे दोन दिवस दोन्ही उमेदवारांवर बुकींकडे लाखो रुपयांचा सट्टा लागलेला आहे.
तरुण मतदार, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, राजकारणाची आवड असणारे, कामगार, नोकरदार असे अनेकजण या सट्ट्याला बळी पडले आहेत. एक हजार रुपयांपासून, तर एक लाख रुपयांपर्यंत हा सट्टा लावण्यात आला आहे.
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8व्या वेतन आयोगात ‘हा’ मोठा बदल पाहायला मिळणार, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल? वाचा….
- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! शहरातील ‘या’ भागात विकसित होणार डबल डेकर ट्विन बोगदा, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार
- महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यान विकसित होणार नवा रेल्वे मार्ग ! रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार आणखी एक Railway स्थानक ! नवा रेल्वे मार्गही विकसित होणार, वाचा…..
- महाराष्ट्रात विकसित होणार एक नवीन भुयारी मार्ग ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार