अहमदनगर :- निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या कामासंबंधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त मोबाइल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणचे २०० मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही.
तसेच २०० मीटरच्या आतील परिसरात पीसीओ चालू ठेवता येणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कोणीही व्यक्ती शस्त्र, क्षेपक काड्यांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू, वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही.
मतमोजणीचे ठिकाणापासून २०० मीटरच्या आत कोणत्याही पक्षाचे कार्यालय किंवा उमेदवाराचे कार्यालय उघडे राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Ahmednagar News : जागरण गोंधळावरून येणाऱ्यांना भीषण अपघात ! पत्नी जागीच ठार तर पती गंभीर
- Ahmednagar Politics : हा आत्मा ५० नव्हे तर ५६ वर्षापासून हिंडतोय ! शरद पवारांनी श्रीगोंदे गाजवले, सभेत तुफान फटकेबाजी
- Samsung Galaxy : सॅमसंगचे दोन सर्वाधिक लोकप्रिय 5G फोन 9000 रुपयांनी स्वस्त, ऑफर पाहून व्हाल चकित…
- सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत का? 24 कॅरेटचे खरेदी कराल की 22 कॅरेटचे? कोणते सोने सर्वात चांगले? वाचा माहिती
- Bombay High Court Bharti : गोल्डन चान्स! मुंबई उच्च न्यायालयमध्ये ‘या’ पदासाठी नोकरीची मोठी संधी, वाचा…