अहमदनगर :- निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या कामासंबंधी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्त मोबाइल फोन किंवा कॅमेरा मतमोजणी ठिकाणचे २०० मीटरचे आतील परिसरात घेऊन जाता येणार नाही.
तसेच २०० मीटरच्या आतील परिसरात पीसीओ चालू ठेवता येणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोणीही व्यक्ती शस्त्र, क्षेपक काड्यांची पेटी, लायटर, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू, वॉकी-टॉकी, कॉडलेस टेलिफोन, ज्वलनशील पदार्थ घेऊन मतमोजणी केंद्रात प्रवेश करता येणार नाही.
मतमोजणीचे ठिकाणापासून २०० मीटरच्या आत कोणत्याही पक्षाचे कार्यालय किंवा उमेदवाराचे कार्यालय उघडे राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













