मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रातील घडामोडी वेगाने बदलतील असे वक्तव्य अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूक झाली आता राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीतील सहकार्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

तसेच, शिवसेनेने माझ्या कार्यक्षेत्रात जे उत्कृष्ट काम केलं, उद्धव साहेबांचे आभार मानायला आलो होतो. माझ्या विजयात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांना दिली.
याचबरोबर, जे संकटांच्या काळात पाठीशी उभे राहिले, त्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी भेटत आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात हालचालींना वेग येईल. असेही त्यांनी म्हंटले.
तसेच, राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच येईल. मुख्यमंत्र्यांनी जसा माझा सन्मान केला, तसा माझ्या वडिलांचाही सन्मान करतील, अशी अपेक्षा आहे. असेही सुजय विखे यांनी म्हंटले.
- Happy Family Tips : स्त्रियांचं म्हणणं ऐकलं तरच पुरुषांचा फायदा ! संशोधनात उघड झालं धक्कादायक सत्य
- GK 2025 : क्रिकेटच्या एका ओव्हरमध्ये फक्त सहाच चेंडू का टाकले जातात ?
- कन्या राशीचे लोक ‘असे’ असतात ! जाणून घ्या कन्या राशीच्या नात्याचं गुपित काय ? एकदा आयुष्यात आले…
- सापाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘ही’ वस्तू ! तुमच्या घरात ‘ही’ वस्तू आवर्जून ठेवा साप घरात चुकूनही येणार नाही
- अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन-चांदी नाही तर ‘या’ वस्तू खरेदी करणं मानलं जात सर्वाधिक शुभ ! 50-100 रुपयांच्या वस्तूने चमकणार तुमच नशीब