अहमदनगर :- नगर तालुक्यातील हातवळण येथे मुलीला पळवून नेण्याच्या वादातून पाच जणांनी एकाला मारहाण केली आहे.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाण करणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंबादास सोन्याबापू जगताप (रा. मठपिंप्री, नगर) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब रंगनाथ मेटे, सुमीत भानुदास जपे, दत्तात्रय कारभारी जपे, सागर दत्तात्रय जपे, सचिन कारभारी जपे (रा. हातवळण) यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गावातील एका तरुणाने मुलीला पळवून नेले आहे. त्यातून वाद झाले होते. त्यावेळी मठपिंप्री येथील अंबादास जगताप हे चारा छावणीमध्ये गेले.
त्या वेळी वाद होऊन जगताप यांना पाच जणांनी काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
- Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोमुळे बदलणार मुंबईचा नकाशा
- अहिल्यानगर जिल्ह्यात होणार्या ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर तोडगा निघणार
- श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा
- संत शेख महंमद महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचा वंशजावर आरोप
- लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची होणार पडताळणी, एवढ्या लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलेचे पैसे राज्य सरकार करणार तात्काळ बंद