‘अहमदनगर :- तुमच्यात बदल व्हावा म्हणून आम्ही सातत्याने संगमनेरला येतच राहणार. आता देश बदलत आहे, तुम्हीही बदला,’ असा सूचक सल्ला ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरमधील व्यापाऱ्यांना दिला.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळण्यापासून ते विजयापर्यंतच्या सर्वच घडलेल्या घडामोंडीचा मार्मिक आढावा विखे पाटील यांनी दिलखुलास गप्पांमधून व्यापाऱ्यांपुढे उलगडून दाखविला. यातील ‘संगमनेर’ची भूमिकाही त्यांनी सांगितली.

एका खासगी कार्यक्रमासाठी विखे यांनी बुधवारी (२९ मे) पुन्हा संगमनेरला हजेरी लावली. दोनच दिवसांपूर्वी घुलेवाडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण होता.
विखे यांचे मुंबई येथून थेट मालपाणी हेल्थक्लबवर आगमन झाले. उद्योगपती मनीष मालपाणी, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष निलेश जाजू, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक किशोर नावंदर, मनीष मणियार यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीनंतर विखे यांनी संगमनेरवर लक्ष दिल्याचे दिसून येते आहे. भविष्यात विखे-थोरात यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची ही नांदी आहे.
केवळ भेटच नाही, तर राजकीय चर्चा आणि भेटीगाठीही ते संगमनेरमध्येच घेत असल्याचे आमदार अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांच्या भेटींवरून दिसून येते
- Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोमुळे बदलणार मुंबईचा नकाशा
- अहिल्यानगर जिल्ह्यात होणार्या ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर तोडगा निघणार
- श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा
- संत शेख महंमद महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचा वंशजावर आरोप
- लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची होणार पडताळणी, एवढ्या लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलेचे पैसे राज्य सरकार करणार तात्काळ बंद