जामखेड :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. यापुढे ते हेच करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त आंबेडकर यांनी चोंडीला भेट देऊन स्मृतिस्तंभास अभिवादन केले. पालकमंत्री राम शिंदे यांनी घोंगडी देऊन त्यांचा सत्कार केला.

पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, भाजप हटवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी हा पर्याय नाही. राष्ट्रवादी हा काँग्रेसमध्ये विलीन होत आहे. ते घाबरले आहेत.

मुस्लिम समाज त्यांच्याकडून निसटून चालला आहे. त्यांनी मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. त्यामुळे ते वंचित आघाडीकडे आकर्षित होत आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादीने विधानसभेसाठी प्रस्ताव दिला आहे का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, तसा प्रस्ताव आलेला नाही. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर चर्चा चालू आहे.
त्यांच्याकडे जायचे कशासाठी? वंचितसाठी काय अजेंडा त्यांच्याकडे आहे? अजेंडा असल्याशिवाय काही शक्य नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे आंबेडकर म्हणाले.
- जमीन, प्लॉटच्या खरेदी-विक्री बाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल ! व्यवहाराला बसण्याआधी न्यायालयाचा निकाल समजून घ्या
- LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलची चिंता सोडा! बघा ए टू झेड माहिती
- सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! आता टाटा कंपनीचे ‘हे’ बॅटरी इन्व्हर्टर मिळणार फक्त 1100 रुपयात, 3 दिवसांचा बॅकअप
- GST Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ट्रॅक्टर खरेदीवर करता येईल 63 हजार रुपयापर्यंत बचत…कसे ते वाचा?
- Ladki Bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी वितरीत…. कधी येतील खात्यात पैसे?