राहुरी :-मुलाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राहुरीत घडली आहे
वैष्णवी कातोरे असे या मृत तरुणीचे नाव असून जोगेश्वरी आखाडा येथील औद्योगिक वसाहतीजवळ कुटुंबाचे वास्तव्य आहे.

त्यांची मुलगी वैष्णवी रवींद्र कातोरे ही राहुरीच्या महाविद्यालयात इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैष्णवीने आपल्या राहत्या घरात असलेल्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.
राहुरी काॅलेजमधील मुलाच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वैष्णवीचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.
वैष्णवीला राहुरी काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याकडून त्रास सुरू असल्याची माहिती नातेवाईकांकडून पुढे आली आहे.
त्रास देणाऱ्या मुलाने Whatsapp च्या माध्यमातून वैष्णवीला संबंधित मुलाकडून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
- मंत्रिमंडळ बैठकीसाठी चोंडीमध्ये प्रशासनाकडून जय्यत तयारी, तीन दिवसांत १५० कोटी खर्च करून भव्य शामियाना, ग्रीन रुम्स, स्टेजसह इतर सुविधा उभा करणार
- अक्षय तृतीयाला तयार होतोय नवा राजयोग ! 30 एप्रिल 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- अहिल्यानगर : मंत्रिमंडळ बैठकीतील मंत्र्याच्या जेवणासाठी खास नगरी बेत, शिंगोरी आमटी, शेंगुळे, वांग्याचं भरीत, ठेचा-भाकरीचा असणार मेन्यू
- Ahilyanagar Railway : अहिल्यानगर जिल्ह्यात होणार 3238 कोटींचा नवा रेल्वेमार्ग, 85 किमी लांबी, 10 स्थानके आणि ‘या’ धार्मिक स्थळांना जोडले जाणार
- सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, सोने १ लाख रूपयांच्या उंबरठ्यावर! खरेदीसाठी नागरिकांची गर्दी !