पारनेर – ढवळपुरी येथे असणाऱ्या तलावात तीन सख्या भावाचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.६) रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
इस्माईल बालम शेख ( वय- २०) नावेद नुरंम्हमद शेख (वय -१६) मोईन निजाम शेख (वय १४) अशी मृत्यू झालेल्या तीन भावंडांची नावे आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याची सुट्टी असलेल्यामुळे ढवळपुरी येथील बिरोबा मंदिर लगत असलेले एका शेतात पिकाला पाणी देण्यासाठी कृत्रिम शेततळे उभारले होते.
हे तीनही भाऊ आज पोहण्यसाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ झाला तरी मुले घरी न आल्यामुळे या भावडांचा घरातील लोकांनी शोध घेतला
काही वेळानंतर मुले शेततलावात पोहत होते. अशी माहिती मिळताच घरातील व गावातील ग्रामस्थांनी शेततलाव जाण्यासाठी धाव घेतली
परंतु एकमेकांना वाचविण्यासाठी धडपड करणा-या तीनही भावांचा मृत अवस्थेत दिसले. या दुर्दैवी घटने बद्दल ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- या बँका देतात 365 दिवसाच्या एफबीवर सर्वाधिक व्याज! FD करण्याआधी नक्की वाचा
- पुण्यातील ‘या’ प्राईम लोकेशनवर असणारे 90 लाखांचे घर आता फक्त 28 लाखात ! Mhada ने जाहीर केली नवीन लॉटरी
- महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली 3% महागाई भत्ता वाढ ! दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय
- एक कोटी रुपयांचे घर खरेदी करण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असायला हवे ? वाचा सविस्तर
- ……. तर तुमचही पॅन कार्ड होणार कायमचे बंद, शासनाचा नवीन आदेश काय सांगतो?













