राहुरी : यंदा दुष्काळाने सर्वत्रच पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी टॅंकर सुरू आहेत, तर काही ठिकाणी विहिरी, विंधनविहिरींचा आधार घेतला जात आहे. मिळेल तेथून पाणी आणून तृष्णा भागविली जात असताना काही ठिकाणी वादाच्या ठिणग्याही पडत आहेत.
मात्र, राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे पाणी भरण्यासाठी आलेल्या दोन महिलांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेचा कान तुटल्याने एकच खळबळ उडली आहे.

सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजता राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथे संदीप दिवाकर कवाणे यांच्या शेतातील एअरवॉलजवळ महिला पाणी भरण्यासाठी आल्या होत्या.
याठिकाणी उषा साईनाथ शिंदे यांची मुलगी अस्मिता ही पाणी भरण्यासाठी गेली. यावेळी तिच्याबरोबर मंगल संदीप कवाणे, संदीप दिवाकर कवाणे, शोभा प्रकाश कवाणे यांनी भांडण करून तिला लाथाबुक्क्याने मारहाण केली.
हे भांडण सोडविण्यासाठी उषा शिंदे गेल्या असता मंगल कवाणे हिने त्यांचे केस धरून तसेच डाव्या कानातील टॉप्स जोरात ओढल्याने उषा शिंदे यांचा कान तुटून त्या जबर जखमी झाल्या. याप्रकरणी उषा शिंदे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गन्हा दाखल केला आहे.
- EPFO लवकरच मोठा निर्णय घेणार…! पीएफ खात्यात ५२ हजार रुपये जमा होणार, कसा असेल नवा निर्णय?
- विठुरायांच्या आणि बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी ! पंढरपूर – तिरुपती दरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरु, कस असणार वेळापत्रक?
- कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक ! अहिल्यानगरच्या ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला तीन हजार रुपयांचा भाव
- पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 19 डिसेंबर पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, 16 स्टेशनवर थांबणार
- ‘हे’ आहे विदर्भातील सर्वात सुंदर हिल स्टेशन….! हिवाळ्यात अनुभवायला मिळतो स्वर्गासारखा नजारा













