श्रीगोंदे :-सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत शेडगाव, (ता. श्रीगोंदे) येथील मंगल दादाभाऊ केदारी या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी सासरच्या लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली. ही व्यथा ऐकून घेण्यास कोणी तयार नसल्याने या त्रासाला कंटाळून उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे केदारी यांनी सांगितले.

लग्नानंतर सासरे भास्कर केदारी, दीर दत्ता केदारी, मार्तंड केदारी व जाव स्वाती केदारी यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. पती दादाभाऊ केदारी यांनी बांधलेल्या घरात आम्ही निवास करत होतो. मात्र, घरावर वरील चौघांनी कब्जा करून ताब्यात घेतल्याने आम्हाला निवारा राहिलेला नाही.
या प्रकरणाची तक्रार श्रीगोंदा पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. मात्र, त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे मंगल केदारी यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, छळ करणाऱ्या या व्यक्तींकडून आम्हा पती-पत्नीच्या जीवितास धोका असून, पोलिस संरक्षण मिळावे व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- 801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !
- पुणे मेट्रो बाबत महत्त्वाची अपडेट ! 27 किलोमीटर लांबीचा नवा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत, CM फडणवीस यांनी दिली माहिती
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! देशातील ‘या’ चार बँकांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला आरबीआयची मंजुरी
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केवायसी केल्यानंतरही ‘या’ महिलांना लाभ मिळणार नाही
- राज्यातील सोयाबीन आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय













