तापमान पोहोचले ४५ अंशावर; जाणून घ्या शरीरावर काय होईल परिणाम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-देशातील काही राज्यांत उष्णतेची भयंकर लाट आली आहे. तापमानाचा पारा आता चाळीशी पार करू लागला आहे. परंतु हे तापमान वाढलं की त्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो हेही जाणून घेणे गरजेचे आहे.

मानवी शरीराचं सामान्य तापमान 98.4 डिग्री फारेनहाइट म्हणजे 37.5 से 38.3 डिग्री सेल्सियस असतं. याचा अर्थ 40 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत शरीरावर फारसा परिणाम होत नाही.

हे तापमान शरीर सहन करू शकतं. आपल्या शरीरात 70 टक्के पेक्षा जास्त पाणी असतं. त्यामुळे शरीरातील पाणी वाढत्या तापमानानात शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करतं.

त्यामुळे आपल्याला घाम येतो आणि शरीरात पाणी कमी होतं. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर चक्कर, डोकेदुखी, बेशुद्ध होणं अशा समस्या उद्भवतात. जर तुमची त्वचा, जीभ, ओठ कोरडे पडू लागलेत,

त्वचा लालसर पडू लागले, मांसपेशी कमजोर होऊ लागल्या तर समजा तुमच्या शरीराचं तापमान वाढतं आहे आणि त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो आहे.

हीट स्ट्रेसच्या लक्षणांबाबत माहिती देताना नेफ्रॉन क्लीनिकचे डॉ. संजीव बागई यांनी सांगितलं, जर तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पार गेला तर शरीरात समस्या उद्भवू शकतात.

परिस्थितीनुसार त्याचे परिणाम वेगवेगळे असतात. मात्र सामान्यपणे 40 ते 42 अंश तापमानात डोकेदुखी, उलटी आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि पारा 45 अंश सेल्सिअसवर गेला तर चक्कर, बेशुद्ध होणं, भीती, ब्लड प्रेशर कमी होणं अशा समस्याही उद्भवतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment