अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे.

पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 मे रोजी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास केली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहरात व उपनगरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरात व उपनगरात चोरी करणारी टोळी जेरबंद केली.
या चोरट्यांनी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न कार्य समारंभासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्या लंपास करतात.
कागदपत्र नंतर देण्याच्या बोलीवर ते गाड्या विकत. या विक्रीतून आलेल्या पैशातून ते गोव्याला जाऊन एन्जॉय करत असल्याचे या चोरीच्या घटनांमधून उघड झाले आहे.
- महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा
- ग्राहक Kia च्या ‘या’ SUV वर फिदा; विक्रीने गाठला लाखोंचा टप्पा
- रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस
- मोठी बातमी ! EPFO कडून आता पीएफचे पैसे फक्त 8 दिवसांत Bank खात्यात; कधीपासून सुरु होणार नवीन सुविधा?
- घर खरेदीदारांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ! बिल्डर लोकांना चपराक













