अहमदनगर – दुचाकी चोरत त्याची विक्रीतुन मिळणाऱ्या पैशावर गोव्याला जाऊन एन्जॉय करणाऱ्या टोळीस तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडून 11 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राजेंद्र नानासाहेब काकडे अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर त्यांचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी हा फरार आहे.

पाईपलाईन रोड वरील वैभव चंद्रसेन राव जगताप यांची 9 मे रोजी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंग मधून दुचाकी लंपास केली होती. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहरात व उपनगरात वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शहरात व उपनगरात चोरी करणारी टोळी जेरबंद केली.
या चोरट्यांनी पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी होणाऱ्या लग्न कार्य समारंभासाठी बाहेरून येणाऱ्या गाड्या लंपास करतात.
कागदपत्र नंतर देण्याच्या बोलीवर ते गाड्या विकत. या विक्रीतून आलेल्या पैशातून ते गोव्याला जाऊन एन्जॉय करत असल्याचे या चोरीच्या घटनांमधून उघड झाले आहे.
- शिवणकाम करणाऱ्याचा मुलगा दुबईत प्रोजेक्ट मॅनेजर! अहिल्यानगरमधील तरूणाचा प्रेरणादायी प्रवास
- अहिल्यानगरमधील ‘या’ साखर कारखान्याने कामगारांना कामावरून टाकले काढून, ‘हे’ कारण देत बसवलं घरी
- अक्षय तृतीयाच्या आधीच मुंबईकरांसाठी गोड बातमी ! मेट्रोची पिवळी मार्गीका झाली सज्ज; ट्रायल रन सुरु, कसा असणार रूट ? वाचा…
- थोडे दिवस थांबा, वाईट काळही निघून जाणार ; 01 मे 2025 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ‘या’ 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये मिळणार, योजनेच्या नव्या नियमांमुळे अनेकांची अडचण