अहमदनगर :- बोल्हेगाव हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या भागाला विकासकामातून शहरीकरणाचे रूप देण्याचे काम केले. निवडणूका या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात.
माझ्या गेल्या साडे चार वर्षांत शहरात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर आहे. ज्यांनी विकासकामे केली नाहीत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव गावठाण येथील भैरवनाथ मंदिर परिसरात उद्यान निर्मितीच्या व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत होते.
जगताप म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे घेऊन गेलो आहे. चैतन्य हॉटेल ते गांधीनगर पर्यंतच्या मूळ रस्त्याचे काम मार्गी लावले.
सावेडी गाव ते बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली व लोकवस्ती वाढली.
विकासाचा अजेंडा हाच माझा ध्यास आहे. नगर शहरात आता विकास कामावर चर्चा सुरू झाली आहे. गेली पाच वर्षे राज्य शासनाकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला व निधी प्राप्त झाला. सर्वांना बरोबर घेऊन विकासाची गुढी उभी करायची आहे.
- रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!
- मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा
- भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?
- फेंगशुईनुसार बनवा घरातील किचन, कायम बरसेल धन-सुखाची कृपा!
- सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?