राहुरी :- तालुक्यातील राहुरी रेल्वे स्टेशन परिसरात महिन्याभरापूर्वी बियरबार हॉटेलातील प्राणघातक हल्ल्यात गंभिर जखमी झालेले मॅनेजर नरेद्र सदानंद शेटे यांचे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने पोलिस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा वाढीव गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान गुन्हेचे गांभिर्य ओळखुन पोलिस निरिक्षक हनुमंतराव गाढे यांनी तत्काळ ३०७, ३२६ चा गुन्हा दाखल केला होता. तर नुकतेच फीर्यादी शेटे हे उपचार दरम्यान मृत्यु झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
यातील तिघा आरोपींना पोलिसांनी मागेच अटक केली आहे. घटनेची पाश्र्वभूमी अशी की, दि. ३० मे २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान राहुरी रेल्वे स्टेशन येथिल हॉटेल अक्षय बियर बार येथे तुमच्या मालकाच्या मुलाने आमच्या माणसाला मारहाण केली होती असे म्हणत
वादाच्या कारणातून हॉटेल मॅनेजर नरेद्र शेटे वय वर्ष५५ यांना आरोपी दिपक भिमराज नवले, वय वर्ष ३३, लक्ष्मण आण्णासाहेब म्हसे, वय वर्ष ३३, अशोक वसंत म्हसे, तिघे रा. कोदवड, भीमराज श्रीधर बोरकर, वय वर्ष ३८, रा. केंदळ
या टोळक्यांनी हॉटेलात घुसून लाठ्या – काठ्या दांडक्याने बेदम मारहाण करत हॉटेलातील सामानाची मोडतोड केली होती. याबाबत राहुरी पोलिसात जखमी शेटे यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- Maha Cabinet Meeting : अहिल्यानगरात दुष्काळाची आग, सरकारच्या मेजवानीला रंग : जनतेच्या तोंडाला पाणी नाही, मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न!
- Ahilyanagar Politics : विखे – राजळे – कर्डीले – पाचपुतेंत रस्सीखेच ? भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय ‘गेम’
- Maharashtra School News : महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बातमी ! राज्यात आता वारकरी शाळा
- RBI चा ऐतिहासिक निर्णय ! बँकेच्या ‘या’ महत्त्वाच्या नियमांमध्ये झाला मोठा बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार?
- लष्करी हद्दीतील समस्यांबाबत खा. लंके यांची बैठक नागरी समस्या तसेच बेलेश्वर, खोपेश्वर मंदिर विकासाचा प्रश्न मार्गी लागणार