अहमदनगर :- नगरमध्ये ट्रक व एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यात बस जळून खाक झाली आहे. बसमधील 28 प्रवाशी जखमी झाले आहेत.
औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृह समोर मंगळवारी पहाटे दोन वाजता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात बसमधील 2८ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. बस चालक आणि वाहक या अपघातात गंभीर जखमी झाले असून या दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातानंतर बसने पेट घेतला. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

एस टी औरंगाबाद हुन राजगुरू नगर येथे जात असताना ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रक ची जोराची धडक झाली. यावेळी मोठा आवाज झाला.
पण काय घडले हे कोणाला लवकर समजले नाही, अपघात झाल्याचे समजताच एकच आरडाओरडा झाला. यात 2८ प्रवाशी जखमी झाले.
बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल आणि अँपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींपैकी पाच ते सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यात एसटी चालक आणि वाहक समावेश आहे.
जखमींमध्ये औरंगाबाद व पुणे येथील प्रवाशांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक व इतर वाहन चालकांनी मदत केली व जखमींना तातडीने रुग्णालयात हरवण्यासाठी प्रयत्न केले.
तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगितले जात आहे.
- MCX Report : सोन्याचा वायदा 95,435 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक ! चांदीच्या वायद्यात 1,657 रुपयांची उसळी
- Inspirational Story : चर्चा तर होणारच ! शेतकऱ्याचा मुलगा बनला गावातील पहिला सरकारी अधिकारी, ठरला गावातील पहिलाच सरकारी नोकरदार
- मारुतीच्या ‘या’ लोकप्रिय 5 सीटर कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली ! 28 किमीच मायलेज अन बरच काही….
- महाराष्ट्राच्या शिरेपेचात पुन्हा एक मानाचा तुरा ! भारताच्या सरन्यायाधीश पदी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन, बी.आर. गवई बनणार नवीन CJI
- भारतातील 100% शाकाहारी शहर, इथं नॉनव्हेज खाण सुद्धा गुन्हा; अंडी, मटण, मासे विक्री केली तर…