श्रीगोंदे :- जमिनीच्या वादातून उक्कडगावात राहणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून लगट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील फिर्यादीला आरोपींनी पोलिसांसमोर मारहाण करून खोटा गुन्हा मंगळवारी दाखल केला,
अशी माहिती मिळाली. संबंधित कुटुंब मोलमजुरी व शेती करून उपजीविका करते. त्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. दादा गोलांडे हा दमदाटी करून हे शेत आमचे आहे, असे म्हणून शिवीगाळ करत असे.
१५ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी शेतातून पाणी आणण्यासाठी जात असताना भाऊसाहेब गोरख गोलांडे याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यांची झटापट झाली.
आरोपीने महिलेस धक्काबुक्की व जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
१६ जुलैला सकाळी ८ च्या सुमारास फिर्यादीच्या पतीस गोरख गोलांडे, राजू गोलांडे, भाऊसाहेब गोलांडे यांनी मारहाण केली.
महिला पतीस सोडवण्यासाठी गेली असता भाऊसाहेब गोलांडेने मिरची पावडर तिच्या डोळ्यात टाकली आणि खाली पाडून मारहाण केली.
पतीचे हातपाय बांधून राजीव गोलांडे व भाऊसाहेब गलांडे यांनी पिकअपमध्ये टाकून मारहाण करत बेलवंडी पोलिस ठाण्यासमोर आणून पोलिसांसमोरही मारहाण केली.
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. पीडिताला मारहाण झाली असताना पोलिसांनी उलट फिर्यादीलाच अटक केली.
- …….तर वाहन चालकांना कोणत्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल मिळणार नाही ! महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय काय ?
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात ‘या’ तारखेपासून परतीचा मान्सून सुरु होणार
- देशातील टॉप 10 लॉ कॉलेजची यादी जाहीर! मुंबई, पुण्यातील महाविद्यालयांचा कितवा नंबर ?
- लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 344 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता, खात्यात कधी जमा होणार ?
- राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?