अहमदनगर :- शहराच्या विकासाठी निधी देण्यात यावा, तसेच एमआयडीसीत नवीन कंपन्या उभारण्यात याव्यात या मागणीसाठी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन शहर विकासासाठी निधी व नवीन कंपन्या उभारण्यात येतील, असे आश्वासन दिले. नगर शहर हे राज्यात मध्यवर्ती ठिकाणी असूनही शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही.
शासनाचे या शहराकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाल्याने शहर विकासापासून वंचित राहिले. परंतु, आता युतीचे सरकार आहे. त्यामुळे शहर विकास होईल अशी आशा नागरिकांना आहे.
या पार्श्वभूमीवर उपनेते राठोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत शहर विकासासाठी निधी उपलब्ध करावा, तसेच नगर एमआयडीसी येथे नवीन कंपन्यांच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
या उद्योगांच्या माध्यमातून नगर शहरात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर आराखडा तयार करण्यात येईल. नगर शहराच्या विकासासाठी निधी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कंपन्या उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक शाम नळकांडे, भगवान फुलसौंदर, दत्तात्रय नागपुरे, मंदार मुळे, शुभम बेद्रे, निशांत दातीर, किरण बोरुडे उपस्थित होते.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ केव्हा मिळणार ? कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार लाभ, CM फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
- मुंबई – पुणे प्रवास फक्त ९० मिनिटात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवेची घोषणा
- शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय ! 25% सवलतीत उपलब्ध होणार नवीन घरे, अर्ज कुठे करावा लागणार?
- वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी बातमी ! ‘या’ शहराला मिळणार नवीन वंदे भारत ट्रेन, कसा असणार रूट ?
- 2025 मध्ये ‘या’ 5 शेअर्सने दाखवला जबरदस्त जलवा ! गुंतवणूकदारांना मिळालेत 6000% पेक्षा जास्त रिटर्न













