अजून किती दिवस आमदार आयत्या पिठावर रेघा मारणार?

 

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-कोपरगाव मतदारसंघात स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधींंचा निधी आणून अनेक कामे, प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावचा विकास कसा करायचा, हे झालेल्या विकास कामातून दाखवून दिले. विद्यमान आमदारांना अद्याप निधी मिळाला नाही.

कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या कामावरच आयत्या पिठावर रेघा मारण्याचे काम विद्यमान आमदार करीत आहेत. अजून किती दिवस ते आयत्या पिठावर रेघा मारणार, असा सवाल नगरसेवक कांबळे व स्वप्नील निखाडे यांनी केली. मतदारसंघातील कोणताही प्रलंबित प्रश्न असो

तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार दिलेला शब्द हा पूर्णच करून दाखवणार अशा कामाची पद्धत स्नेहलता कोल्हे यांची आहे. कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात विकास कसा असावा हे दाखवून दिले त्यांनी कसा विकास केला याची पाहणी करता करता विद्यमान आमदार दमछाक झाली.

निवडणुकीत लक्ष्मीनगरच्या जनतेला सांगितलं होते की, लक्ष्मीनगरच्या जनतेला ७/१२ मिळणार नाही हे आमदारांनी दिलेलं गाजर आहे, अशी भाषणबाजी केली. आणि आता तेच ७/ १२ लवकर मिळावा म्हणून निवेदन देताना फोटो सोशलवर टाकत आहेत.

लक्ष्मीनगरचा सर्व्हे नंबर तरी माहीत आहे का, सोबतच्या व्यक्तींना. लक्ष्मीनगरच्या नागरिकांना माहीत आहे हा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी किती प्रयत्न केले व करीत आहे. विश्वास नसेल तर प्रत्येकाच्या घरात जावून विचारा याचे उत्तर मिळेल.

प्रत्येक गोष्टीत मी हे काम केले, असे ते म्हणतात. निवेदन देऊन एका दिवसात चालना मिळत नसते. त्यासाठी पाठपुरवा करावाच लागतो. विद्यमान आमदारांमुळे नव्हे, माजी आमदारांमुळेच लक्ष्मीनगर भागातील प्रश्नाला चालना मिळाली, हे विद्यामान आमदारांना विसरून चालणार ना

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment