अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- कोरोना संकटकाळात सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष अमित काळे, माजी नगरसेवक अजय साळवे, विनोद भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, गौतम कांबळे, चंद्रकांत भिंगारदिवे उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांची व त्यांच्या कुटुंबीयांची पिळवणूक होत आहे. शासकीय रुग्णालयात बेड असून देखील दुसरीकडे जाण्यास सांगितले जात आहे.
ही सर्वसामान्यांची पिळवणूक न थांबल्यास आरपीआयच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved