शेवगाव- पावसा अभावी परिसरातील पीके जळून चालली आहेत. सध्या पन्नास टक्क्यांच्यावर भरलेल्या मुळा धरणातून आव्हाणे परिसरातील टेलच्या गावांना किमान पिण्यासाठी एकतरी आवर्तन सुटावे अन्यथा हेच हक्काचे पाणी नंतर मराठवाड्यात निघून जाईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे, पाण्यासाठी तरी राजकारण व्हायला नको असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.
तालुक्यातील आव्हाणे बु. येथे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काका नरवडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, जि.प. सदस्य रामभाऊ साळवे, पं. स. सदस्या मनिषा कोळगे, सरपंच संगीता कोळगे, अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, ऍड. विनायक आहेर, डॉ. सुधाकर लांडे, नारायण बैरागी, रघुवीर उगले, वसंत भालेराव, उपसरपंच सुधाकर चोथे, शिवाजी आहेर आदी प्रमुख उपस्थित होते.
- ‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….
- मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी
- महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार
- पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील
- दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग ! ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?