कर्जत – तालुक्यातील 21 गावांसाठी संजीवनी देणाऱ्या तुकाई चारी योजनेसाठी 100 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर केले. अनेक पिढ्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने तुकाईचारीचा अनेक वर्षांचा प्रश्न मंत्रिपदाच्या माध्यमातून सोडविला. विविध विकासकामांसाठी भरभरून निधी, विविध योजना आणि खात्यांमधून आणण्याचे काम सातत्याने केले.
यापुढेही मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणारच आहे. शेवटी आपल्यातला तो आपलाच अन परका तो परकाच एवढं मात्र खरं असे म्हणत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द येथे वालवड- चांदे खुर्द ते गुरवपिंप्री रस्ता डांबरीकरण कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, ज्या परिस्थितीत मी माझं आयुष्य जगलो आहे, ते आयुष्य माझ्या मतदाराच्या वाटेला येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मी माझ्या मतदारांना अभिमान वाटेल असे कार्य जलसंधारण खात्याच्या माध्यमातून केले आहे. कारखानदारी- उद्योग, शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा स्वार्थी विचार कधी मनाला शिवला नसल्याचे ते म्हणाले.
- भारतातील टॉप 10 भ्रष्ट सरकारी विभाग कोणते ? सर्वाधिक भ्रष्ट सरकारी खात्याचे नाव आहे शॉकिंग
- दररोज 37,000 रुपयांचे कमिशन ! पेट्रोल-डिझेल विक्रीतून व्हाल मालामाल, पेट्रोल पंपाचे लायसन्स कस मिळत, किती पैसे लागतात?
- वास्तु दोष, वाईट नजर आणि अपयश सगळं काही दूर होईल! ‘हा’ वास्तू उपाय एकदा करून बघाच
- Post Office ची MIS स्कीम गुंतवणूकदारांसाठी ठरणार वरदान ! 2,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- BSF Constable Tradesman Jobs 2025: सीमा सुरक्षा दलात मेगा भरती जाहीर! तब्बल 3588 जागांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा