शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 1 कोटी 91 लाख जमा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. खूप मोठी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आहे.

2019-20 या वर्षाच्या कपाशी पीक विम्याचे 1 कोटी 86 लाख रुपये व 2018-19 या वर्षाच्या ज्वारी पीक विम्याचे 5 लाख असे एकूण पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देत दिलासा दिला आहे. अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका, कोपरगाव, पोहेगाव, सुरेगाव व रवंदे या पाचही महसूल मंडलातील असंख्य शेतकर्‍यांनी मागील वर्षी 2019/20 मध्ये कपाशी पिकांचा विमा भरलेला होता.

या शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. यामध्ये मागील वर्षीच्या कपाशी विम्याचे 1 कोटी 86 लाख व 2018 च्या ज्वारी पीक विम्याची 5 लाख 27 हजार असा एकूण 1 कोटी 91 लाख 27 हजार रुपये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

सर्व मंडलातील एकूण 2 हजार 350 शेतकर्‍यांना याचा फायदा झाला आहे. सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. शेतकऱ्यांना महाविकास आघाडीने दिलेल्या या विम्यामुळे चांगलाच आधार मिळाला आहे.

त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment