नगर :- शहरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी दारुड्या वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
मागील सात महिन्यांत तब्बल एक हजार मद्यधुंद वाहनचालकांना पकडून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी अनेकांना दंडात्मक, तर काहींना थेट तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
दारू पिऊन वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा मद्यपींवर केवळ ३१ डिसेंबरच्या रात्रीच सक्षमपणे कारवाई करण्यात येते. आता मात्र पोलिसांनी या मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सातत्याने कारवाई सुरू केली आहे.
कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाणे तसेच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिस अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवण्यात येत आहे. राज्याच्या रस्ता सुरक्षा समितीनुसार अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघातांचे हे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नगर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. शहर परिसरात रात्रीच्या वेळी अचानक नाकाबंदी करून वाहनचालक दारू पिले आहेत काय? याची ब्रेथ ऑनालायझर उपकरणाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे सुसाट सुटलेल्या मद्यपींना चाप बसत आहे.
- श्रावण महिन्यात पती-पत्नीने नक्की करावेत ‘हे’ उपाय; प्रेमातले दुरावे कमी होऊन वैवाहिक जीवनात येईल सुख-शांती!
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २६२ क्विंटल फळांची आवक, मागणी वाढल्यामुळे भावात वाढ
- ‘हा’ आहे जगातील सर्वात छोटा देश, लोकसंख्या बोटावर मोजता येईल इतकी! तरीही या देशात आहे स्वतःच सरकार, चलन आणि राजघराणं
- पुणे मेट्रो संदर्भात मोठी अपडेट ! 3 सप्टेंबर 2025 रोजी ‘या’ मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, कसा असणार रूट?
- शेवगाव तालुक्यातील ढाकणे महाविद्यालयाच्या २४२ विद्यार्थ्यांची विविध नामवंत कंपन्यांमध्ये निवड