श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले
याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.

काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,
सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.
- 3 वर्षात 529% रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्ये सलग 8 दिवस झाली मोठी घसरण ! आता पुन्हा रॉकेट तेजीत संकेत, कारण काय?
- धक्कादायक ! महाराष्ट्रात आढळलेत 88 लाख रेशन कार्डधारक संशयास्पद, संशयास्पद नागरिकांचे रेशन कार्ड होणार रद्द?
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच हक्क मिळणार का ? सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम निकाल !
- अहिल्यानगर शहराची हवा ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या बाजूने – द ग्रेट खली एन्ट्रीने भाजपा राष्ट्रवादीच्या प्रचारात रंगत !
- मकर संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता पण मिळणार नाही का ? निवडणूक आयोगाचे आदेश सांगतात….













