श्रीगोंदे :- सत्ता असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखांत सहभागी होऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कष्ट घेतले. ज्यांना विकासासाठी निवडून दिले, त्यांनी काय दिवे लावले
याचे आत्मचिंतन करून जनतेनेच ठरवायचे तालुक्याचा आमदार कोणाला करायचे, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे बोलताना सांगितले.

काष्टी येथे संतवाडी रस्त्याचे दीड कोटी खर्चून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन करताना पाचपुते बोलत होते. ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवाजीराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, ज्ञानदेव गवते,
सरपंच सुलोचना वाघ, वैभव पाचपुते, संदीप पाचपुते, अमोल पवार, बन्सी महाराज पाचपुते, विकास पाचपुते, बाळासाहेब धुमाळ, महेश दरेकर, नवनाथ राहिंज, अनिल पाचपुते उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे सुरू आहेत. ज्यांना निवडून दिले ते याचे श्रेय घ्यायला निघालेत, अशी टीका पाचपुतेंनी आमदार राहुल जगतापांचे नाव न घेता केली.
- अरे वा ! ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 397 किलोमीटरचे अंतर फक्त पाच तासात पूर्ण होणार
- ब्रेकिंग : MPSC भरती प्रक्रियेत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बदल ! एमपीएससी परीक्षेमध्ये ‘या’ उमेदवारांना आता नो एन्ट्री
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! EPFO पेन्शनच्याबाबत लवकरच ‘हा’ निर्णय घेणार
- बँकेच्या वेळापत्रकात मोठा बदल ! पुढील 4 दिवस देशातील ‘या’ बँका बंद राहणार, RBI ने दिली मोठी माहिती
- ‘या’ महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारचा ग्रीन सिग्नल ! 4,200 कोटी रुपयांचा नवा एक्सप्रेस वे ‘हे’ 2 Expressway जोडणार