अहमदनगर :- माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा खून करणाऱ्या राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील दोघांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा निकाल दिला. पती गोविंद सर्जेराव हारदे (वय ३८), सासरा सर्जेराव हारदे (रा. राहुरी, तुळापूर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. २०१३ मध्ये वैशाली हारदे हिचा खून करण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी वकिल केदार केसरकर यांनी दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. साक्षीदारांची साक्ष, दाखल कागदपत्रे, परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
तर सासूविरुद्ध पुरावे नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लग्न झाल्यानंतर दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर वैशाली हारदे हिचा सासरच्या लोकांकडून छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. माहेरून चारचाकी गाडी आणण्यासाठी सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता.
- अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित
- आरोग्य व्यवस्थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाले – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- अहमदनगर : स्वतःच्या जमिनीत सापडलेले गुप्तधन परत मिळावे यासाठी न्यायालयात याचिका ! सुनावणी सुरु, आतापर्यंत काय-काय घडलं ?
- NCL Pune Bharti 2024 : NCL पुणे मध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी!
- भाजपाच्या पाठींब्याचे बुमरँग विजय औटींवर उलटले ! पदाधिकाऱ्यांकडून नीलेश लंके यांना पाठींब्याची घोषणा