नगर – शिक्षणातील जीवघेण्या स्पर्धेत कला लुप्त पावत असतांना चित्रकला स्पर्धेतून निर्माण होणारा नवनिर्मितीचा आनंदबालकांचे जीवन समृद्ध करणारा असल्याचे प्रतिपादन जिल्हा वाचनालयाचे कार्यवाह विक्रम राठोड यांनी केले. स्वातंत्र्य दिनाचेऔचित्य साधून आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बेालत होते.
अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला. बाई इचरजबाई प्रशालेतदोन गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे 630 बालके चित्र साकारण्यात रमुन गेले.

स्पर्धेचे उद्घाटन कार्यवाह विक्रम राठोड व उपाध्यक्षअजित रेखी, शिल्पा रसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक किरण आगरवाल, दिलीप पांढरे, राहुल तांबोळी, गणेश अष्टेकर,परिक्षक अशोक डोळसे, कवी चंद्रकांत पालवे, माजी ग्रंथपाल संजय लिहिणे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवीकुक्कडवाल व कर्मचारी उपस्थित होते.
- महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
- ‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
- MCX Report : सोन्याच्या वायद्यात ३,२२१ रुपये आणि चांदीच्या वायद्यात ३,४४२ रुपयांची वाढ
- टाटा मोटर्सचा मास्टरप्लॅन ! 2025 मध्ये नव्या सात गाड्या लाँच करण्याची तयारी, पहा संपूर्ण यादी
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा