पाथर्डी :- पक्षात कोणाला यायचे तर या, पण उमेदवारी मात्र मोनिका राजळेंनाच असेल. काही जण शेजारी जातात (बीड जिल्हा), पण काही उपयोग नाही. खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांना मी अहवाल दिला आहे, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असले, तरी उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मंगळवारी दिले.
मागील आठवड्यात वैद्यनाथ साखर कारखान्यावर प्रताप ढाकणे व मंत्री पंकजा मुंडे यांची इनकॅमेरा चर्चा झाली. तो संदर्भ देत डॉ. विखे यांनी राजळेंना दिलासा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या २५ ला महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत येत आहेत. त्याच्या नियोजनासाठी राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार राजळे, जनादेशयात्रा समन्वयक प्रसाद ढोकरीकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, गटनेते सुनील ओव्हळ, सोमनाथ खेडकर, राहुल राजळे, काशीबाई गोल्हार, सुरेखा ढाकणे, ज्योती मंत्री, नगरसेवक रमेश गोरे, बाळासाहेब अकोलकर, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगावचे भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, भगवान साठे या वेळी उपस्थित होते.
वांबोरी चारीचा विषय मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावून टप्पा क्रमांक दोनबाबत लक्ष वेधू, असे सांगून खासदार विखे म्हणाले, राहुरी, नगर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील सिंचन क्षेत्र चारीच्या पाण्यावर अवलंबून असून पाथर्डी तालुक्यातील सर्व १०२ पाझर तलाव भरून मढीपर्यंत चारीचे पाणी आणण्याची मी व आमदार राजळे मिळून पार पाडू. प्रवरा उद्योग समूहाचे ३० कर्मचारी चारी परिसरात देखरेख करतील. राज्यातून बाहेर जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागासह अन्यत्र वळवण्याचा आराखडा राज्याने केंद्राकडे सादर केला आहे. निधी मंजूर होताच या कामाला प्रारंभ होईल.
- अरे वा ! ‘या’ रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन, 397 किलोमीटरचे अंतर फक्त पाच तासात पूर्ण होणार
- ब्रेकिंग : MPSC भरती प्रक्रियेत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बदल ! एमपीएससी परीक्षेमध्ये ‘या’ उमेदवारांना आता नो एन्ट्री
- खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! EPFO पेन्शनच्याबाबत लवकरच ‘हा’ निर्णय घेणार
- बँकेच्या वेळापत्रकात मोठा बदल ! पुढील 4 दिवस देशातील ‘या’ बँका बंद राहणार, RBI ने दिली मोठी माहिती
- ‘या’ महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाला फडणवीस सरकारचा ग्रीन सिग्नल ! 4,200 कोटी रुपयांचा नवा एक्सप्रेस वे ‘हे’ 2 Expressway जोडणार