जळगाव :- लायटिंगच्या व्यवसायातून ३५ हजार रुपयांपैकी १० हजार रुपये बाकी असल्याच्या कारणावरून दोन तरुणांमध्ये शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये वाद झाले.
त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघांनी तरुणाच्या घरी जाऊन बाहेर बोलावले. काही अंतरावर नेऊन त्याला बेदम मारहाण केली.

दोघांनी पाच वेळा वीस किलो वजनाचा दगड तरुणाच्या डोक्यात घालून हत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री ईश्वर कॉलनीत घडली. पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे.
घनश्याम शांताराम दीक्षित (वय ३७, रा. ईश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सनी उर्फ चालीस वसंत पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) व मोहिनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी (रा. सबजेलच्या मागे) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
- अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…
- MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या स्मार्ट बसेस ! Pratap Sarnaik यांनी स्पष्टच सांगितलं
- अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा
- शिर्डी साईबाबा संस्थानच्या कारभारात मोठा बदल ! कारभारासाठी सरकारकडून नवा फॉर्म्युला तयार
- 15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल ! शाळा उघडण्याआधीच नवीन टाईम टेबल जाणून घ्या