पाथर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली.
त्यांनी (राष्ट्रवादी) काढलेल्या यात्रेला कार्यकर्तेही जमत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडविली.

महाजनादेश यात्रेनिमित्त पाथर्डीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की दोन्ही काँग्रेस सत्तेवर असताना त्यांची माजोरी आणि मुजोरी जनतेने अनुभवली. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.
महाजनादेश यात्रा काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा काढली. उशिरा का होईना मतदार हा राजा आहे, आपण नाही हे त्यांना कळाल्याचे ते म्हणाले.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
- Dental Health : पिवळसर दातांवर घरबसल्या इलाज! ही फळं खाल्लीत तर दात होतील पांढरेशुभ्र!
- Brush Tips : दात घासताना किती टूथपेस्ट वापरली पाहिजे ? एक चूक तुमचे दात कायमचे खराब करू शकते…
- शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता
- UIIC Apprentice Jobs 2025:पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! इन्शुरन्स कंपनीत मोठी भरती सुरू
- मे महिना मुंबईकरांसाठी ठरणार स्पेशल ! 06 मे 2025 पासून ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 13 Railway Station वर थांबणार