अहमदनगर : हातउसने घेतलेला एक लाखाचा धनादेश न वटल्याप्रकरणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी भाविशा गाटे यांनी कांचन गोरख चंदन (रा.साई नगर, बोल्हेगाव) या महिलेस दोन महिने साधी कैद व आरोपीने फिर्यादीला दीड लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
या खटल्याची माहिती अशी की,फिर्यादी आशा सुनील जाधव (रा. नेप्तीनाका, नालेगाव) यांच्याकडून कांचन चंदन (रा.साईनगर, बोल्हेगाव) हिने दि.१७ जुलै २०१७ रोजी एक लाख रुपये हात उसने घेतले होते. त्यापोटी आरोपीने फिर्यादीला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन दिली होती.

हि रक्कम सात महिन्याच्या आत फिर्यादीला परत करण्याचा वायदा आरोपीने दिला होता. सात महिन्याची मुदत संपल्यानंतर फिर्यादीने आरोपीकडे हातउसने घेतलेली रक्कम परत करण्यासाठी तगादा केला असता आरोपीने युनायटेड बँक ऑफ इंडिया शाखेचा धनादेश दिला.
हा धनादेश फिर्यादीने स्टेट बँकेच्या दिल्लीगेट शाखेत भरला असता हा धनादेश परत आला. दरम्यान, फिर्यादी आशा जाधव यांनी न्यायालयात दावा दाखल केला. या खटल्याची गुणदोषावर चौकशी करुन न्यायालयाने आरोपी कांचन चंदन हिला दोन महिने साधी कैद व आरोपीने फिर्यादीला दीड लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
तसेच निकालापासून दोन महिन्याच्या आत आरोपीने फिर्यादीला नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीला आणखी एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात नोटरी पब्लिक आर. आर. पिल्ले यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
- महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांमधील अंतर 135 किलोमीटरने कमी होणार ! येत्या 30 दिवसात मंजूर होणार 1,600 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प
- जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीत महागाई भत्ता (DA) किती वाढणार ? समोर आली मोठी अपडेट
- महाराष्ट्रातील Railway प्रवाशांचे नशीब उजळणार ! ‘या’ नवीन रेल्वे मार्गासाठी सरकारकडून 836 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
- मुंबईहून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात मोठा बदल ! 15 जूनपासून लागू होणार नवीन टाईम टेबल
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ 79 Railway स्थानकावर मोफत वायफाय, मोफत वायफाय कसे कनेक्ट करायचे ?