नवी दिल्ली : स्थिती चिंताजनक असल्याची टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी केली. सिंग म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पादन केवळ ५% च्या दराने वाढले आहे. यातून मंदीच्या विळख्यात असल्याचा इशारा मिळतो.
भारतात वेगवान विकासाची क्षमता आहे. मात्र, मोदी सरकारच्या चहुबाजूच्या कुव्यवस्थापनामुळे मंदी आली आहे. निर्मिती क्षेत्राचा वृद्धी दर ०.६% आहे. यातून स्पष्ट होते की, अर्थव्यवस्था अद्यापही नोटबंदीचा चुकीचा निर्णय आणि घाईत लादलेल्या जीएसटीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरू शकली नाही.

विकास दर १५ वर्षांत सर्वात नीचांकी स्तरावर आहे. मनमोहन यांच्या वक्तव्यावर अर्थमंत्री सीतारमण यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उत्तर देणे टाळले. आपण औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटत अाहोत. समस्या ऐकून घेत आहोत.
उद्योग जगताला काय हवे आहे याबाबत सल्ला घेत आहोत, असे त्या म्हणाल्या. सीतारमण यांनी देशात मंदी आहे काय, सरकार मंदीच्या बातम्यांशी सहमत आहे का, या प्रश्नाला थेट उत्तर देणे टाळले.
- 18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला एक जानेवारी 2026 पूर्वी ‘हे’ काम करावे लागणार ! शासनाने दिलाय अल्टिमेटम
- Tata समूहाचा ‘हा’ स्टॉक पुन्हा कमबॅक करणार ! टॉप ब्रोकरेजने दिली शेअर्ससाठी Buy रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
- Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत 8 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार साडेतीन लाख रुपयांचे व्याज !
- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी….! ‘या’ मार्केटमध्ये कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव
- तरुणांना मिळणार देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF कडून ‘या’ जागांसाठी निघाली मेगाभरती, वाचा डिटेल्स