पाटणा : देशात आर्थिक मंदीवर राजकीय वर्तुळात चौफेर चर्चा सुरू असतानाच दरवर्षी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी येतच असते, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सोमवारी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधक खोडसाळपणे मंदीच्या मुद्यावरून विनाकारण गोंधळ घालत असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. सकल घरेलू उत्पादन अर्थात जीडीपी खाली घसरला आहे.

अशातच अर्थव्यवस्था सुस्तावल्याची आकडेवारी दिवसागणिक उजेडात येत आहे. त्यातच बिहारचे अर्थमंत्री सुशील मोदी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेत मंदी येणे, हा एक नियमित प्रकार आहे. विशेषत: श्रावण आणि भाद्रपद महिन्यात अर्थव्यवस्था मंदावत असते.
यात काहीही नावीन्य नाही. तरीही मंदीच्या मुद्यावरून विरोधकांद्वारे उगीचच अकांडतांडव करणे चुकीचे आहे. मंदीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना अमलात आणण्यास प्रारंभ केला आहे. याकरिता ३२ सूत्री दिलासा पॅकेजची घोषणा केंद्राने केली आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
- प्रतीक्षा संपली! Nothing Phone 3 कधी होणार लाँच? काय असतील स्पेसिफिकेशन्स?; वाचा A टू Z माहिती
- Nothing च्या CMF Phone 2 Pro मध्ये असणार ‘Everything’; लाँचआधीच किंमत आणि फीचर्समुळे मार्केटमध्ये खळबळ
- अक्षय तृतीयाला एक डझन हापूस आंब्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये ! भाव कमी होणार की वाढणार ? वाचा…
- Samsung Galaxy M56 5G : AI फीचर्स, मोठी बॅटरी आणि बरंच काही!Samsung चा नवीन फोन खरेदी करा फक्त 27,999 रुपयांत
- 50MP कॅमेरा आणि 45W चार्जिंग! Samsung Galaxy S24 आता आकर्षक किंमतीत, Amazon वर मिळतेय 30% पर्यंत सूट