अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या चळवळीद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी कळमकर म्हणाले,आपण शहराचे महापौरपद भूषविलेले असून मिळालेल्या कमी कालावधीतही प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केला.शहरातील मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर दिला.महापालिकेतील कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करताना लोकांच्या असलेल्या अपेक्षा व त्या पूर्ण करताना येणारे अडथळे याची जाणीव झाली.
याशिवाय नगरमधील विविध क्षेत्रातील मंडळी तसेच शहरात चांगले काही तरी करण्याची तळमळ असलेली तरुणाई यांच्याशी संवाद साधताना नेहमी एक गोष्ट समोर आली की,लोकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळत नाही.अशा अनेक बाबींचा अभ्यास करून अहमदनगर स्पीक्स हे नगरकरांचा आवाज ठरणारे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
- अहिल्यानगरमध्ये १६६९ क्विंटल भाजीपाल्याची आवक, गवारीला १२ हजार रुपयांपर्यंत भाव
- अहिल्यानगर बाजार समितीत फळांची आवक घटली, मात्र डाळिंबाच्या भावात मोठी वाढ, प्रतिक्विंटल मिळतोय एवढा भाव?
- पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ ८१ गावात आढळले दूषित पाणी, आजारांचा धोका वाढला
- पालकांनो, मुलांना स्कुलबसमधून शाळेत पाठवताय? तर खबरदारी घ्या अन् स्कुलबसचं ‘हे’ प्रमाणपत्र नक्की तपासून पहा!