संगमनेर : एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्ष काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले. आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जाती धर्माच्या नावाखाली खोट्या भुलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले असून तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर खुर्द येथील कुबेर लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी युवक व कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ॲड माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, संपतराव डोंगरे, पांडुरंग पा घुले, आर बी रहाणे, सौ अर्चना बालोडे, नवीन संचालक रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, दिलीप नागरे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, भाऊराव रहाणे, सरपंच गणेश शिंदे ,मधुकर गुंजाळ, रमेश सुपेकर, आदींसह परिसरातील विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, धर्माच्या नावावर विधानसभा निवडणुकीत जनतेला फसवले गेले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्याची बसवलेली घडी थोडी विस्कटली. सरळ विरोधक परवडले पण दोन्हीकडे राहणारे नको. आपला तालुका कुटुंब आहे. चुकीच्या पद्धतीने वागले तर त्याचा त्रास सर्वांना होतो. मागील 40 वर्षात एकही दिवस विश्रांती घेतली नाही सातत्याने काम केले धरण आणि कालवे आपणच पूर्ण केले. हक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला मिळालेच पाहिजे. तालुक्यातील कालव्यांना प्लास्टर चे काम सुरू झाले. आपली पहिली मागणी होती की अगोदर आमचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे बारे काढून द्या आणि मग प्लास्टर करा. हे पाणी सर्वांना मिळालेच पाहिजे. ते काम आता होत आहे
आमदारकी हे सर्व तालुका व सहकारी संस्थांना मोठे कवच होते .मात्र जनतेने ते कवच गमावले आहे. त्याचा लगेच त्रास सुरू झाला आहे शहराजवळील गावांना आश्वी अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्याचा डाव आहे. तर शहरांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. आपले सुसंस्कृत राजकारण व संस्कृती टिकवण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून तालुक्याच्या कुटुंबासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे.
कारखान्याने कायम सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर काम केले असून आगामी काळामध्ये प्रति एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढल्याने राज्यात एक नंबर देणे भाव सातत्याने शक्य होणार आहे. सर्व सहकारी संस्थांचे काम चांगले असून तालुक्यातील सर्व जनता व विरोधकही मान्य करतात. विधानसभेत चूक झाली असेल परंतु आता सहकारी संस्थांच्या बाबत होणार नाही. झालेल्या चुका दुरुस्त करून सर्वांनी एकजुटीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले.
ॲड माधवराव कानवडे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करून 30 टक्के पाणी धरण व कालवे पूर्ण कायम जनतेसाठी काम करणारे हे नेतृत्व आहे. मात्र त्यांचा पराभव हा तालुक्यासाठी मोठा अपघात असून हे झालेच कसे असा राज्याला प्रश्न पडला आहे . यामध्ये कार्यकर्ते कमी पडले असून तरुणांनी जातीभेदाच्या आमिषाला बळी न पडता संत ज्ञानेश्वर व समतेचा विचार घेऊन काम करावे असे ते म्हणाले
तर बाबासाहेब ओहोळ म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने चांगले काम केले. तालुका स्तरावर आपल्याला मोठी संधी दिली याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना या पुढील काळातही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करू असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाटील गुंजाळ यांनी केले .तर रवी नेहे यांनी आभार मानले. यावेळी चंदनपुरी, आनंदवाडी, झोळे, संगमनेर खुर्द, खांडगाव ,यशवंतनगर ,निमज, सावरगाव तळ येथील सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे पाईप अधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून फोडले
संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. कालव्यांच्या वरील भागातील शेतकऱ्यांनाही त्यांचे पाणी देण्यासाठी तातडीने काम झाले पाहिजे. आम्ही हक्काचे पाणी मागत आहोत. ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पाईप टाकले. हे पाईप अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून फोडले असा सवाल करताना मंत्री महोदय असा चुकीचा आदेश देतील असे मला वाटत नाही असे ते म्हणाले .मग हे पाईप फोडण्याचे धारिष्ट झाले कसे ?कुणाच्या आदेशावरून पाईप फोडले . शेतकऱ्यांशी चर्चा चर्चा केली पाहिजे. खालच्या भागाचे शेतकरी सुद्धा आपलेच आहेत. परंतु समन्वय करून प्रश्न सोडवता येतो . पाणी मिळाले नाही तरी अनेक ग्रामपंचायतींना पाणीपट्टीच्या नोटीसा आलेल्या आहे. पहिले शेतात पाणी द्या मग पाणीपट्टी भरतो. असे सांगताना प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना 18 तास लाईट मिळाली पाहिजे मात्र रोटेशन चालू असताना पाच तास सुद्धा लाईट मिळत नाही. हे काय सुरू आहे .आता आपल्या तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच नसल्याने हा त्रास सहन करावा लागणार म्हणून सर्वांनी संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी तयार राहा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.