Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की, नवग्रहातील सर्वच ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. न्यायदेवता शनि ग्रहाचे देखील वेळोवेळी राशी परिवर्तन होते.
शनी ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सुद्धा होत असते. दरम्यान जेव्हा – केव्हा शनी ग्रहाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा राशीचक्रातील सर्वच राशीच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.

शनी ग्रह तब्बल अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करत असतो आणि मार्च 2025 मध्ये शनि ग्रहाचे राशी परिवर्तन झाले आहे. शनी ग्रहाने कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश घेतला आहे. जून 2027 पर्यंत शनी ग्रह आता याच राशीत राहणार आहे. दरम्यान शनी ग्रह आता लवकरच मार्गी होणार आहे.
याचाच प्रभाव म्हणून राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा वाईट काळ इतिहासात जमा होणार आहे. राशी चक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहे.
कोणत्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार?
मकर : या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ लवकरच सुरू होईल. प्रत्येकच क्षेत्रात या राशीच्या लोकांना चांगले नेत्रदीपक यश मिळणार आहे. शनी ग्रह मार्गी झाल्यानंतर या राशीच्या लोक दूरचे प्रवास करतांना दिसतील.
या काळात या राशीच्या लोकांना पैशांशी संबंधित कोणतीच अडचण भासणार नाही. या काळात या लोकांना आर्थिक स्थैर्यता लाभणार आहे. तसेच अडकलेल्या पैशांची वसुली होईल.
जे लोक नोकरी करतात त्यांना या काळात प्रमोशनची मोठी भेट मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फारच अनुकूल राहणार आहे. विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत घेतली तर त्यांना शंभर टक्के चांगले परिणाम मिळतील.
कर्क : या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ अधिक फायदेशीर राहणार असे म्हटले जात आहे. मकर राशीच्या लोकांप्रमाणेच कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा आगामी काळात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
शनि देवाच्या कृपेने या लोकांचा समाजात असणारा मान सन्मान आणखी वाढणार आहे. जे लोक नोकरी करत असतील त्यांना पदोन्नतीची भेट मिळू शकते. वैवाहिक आयुष्य अधिक सुखकर होईल अशी आशा आहे. मानसिक तणाव दूर होईल आणि जीवनात सकारात्मकता वाढेल असे सुद्धा बोलले जात आहे.
वृषभ : या राशीच्या व्यक्तींनाही शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मोठे फायदे मिळणार आहेत. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि यांच्या कामाचे सगळीकडे कौतुक होऊ शकते.
कार्यस्थळी या लोकांचे विशेष कौतुक होणार आहे. कुटुंबात अगदीच आनंदाचे वातावरण राहणार आहे. आयुष्यातील विविध अडचणी या काळात दूर होतील. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.