सुखाचे दिवस संपलेत, आता संकटाचा काळ सुरु होणार ! 16 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार अडचणींच वादळ

राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा वाईट काळ लवकरच सुरू होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांनी राहू आणि चंद्र ग्रहाची युती होणार आहे आणि यामुळे राशीचक्रातील काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात आणि याचा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सकारात्मक किंवा मग नकारात्मक असा प्रभाव पडत असतो.

ज्योतिष तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे नवग्रहातील चंद्र आणि राहू या दोन ग्रहांचे नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच राशी परिवर्तन होत असते. दरम्यान येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 16 जून रोजी चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे.

या दिवशी चंद्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, खरे तर कुंभ राशीत आधीच राहू ग्रह उपस्थित आहे. म्हणजेच या दिवशी कुंभ राशीत राहू आणि चंद्र या दोन ग्रहांची युती होणार आहे आणि याचाच अशुभ प्रभाव राशीचक्रातील काही राशीच्या लोकांवर आपल्याला पाहायला मिळू शकतो.

खरे तर जेव्हा केव्हा राहू आणि चंद्र एकाच राशीत येतात तेव्हा ग्रहण योग बनतो. या ग्रहणाचा काही लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल तर काही लोकांच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर येईल.

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार अडचणींच वादळ 

मिथुन : या राशीच्या व्यक्तींचा संकटाचा काळ आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. यामुळे या लोकांनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ज्योतिष तज्ञ सांगतात की ग्रहणामुळे या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या लोकांनी आरोग्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

मानसिक थकवा, निद्रानाश आणि उच्च रक्तदाबासारख्या आरोग्यविषयक समस्यांचा या लोकांना सामना करावा लागू शकतो. याशिवाय या लोकांच्या काही योजना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, विशेषता प्रवास आणि परदेशाशी संबंधित योजना अडथळ्यांमुळे लांबणीवर पडू शकतात. 

मेष : या राशीच्या लोकांच्या आयुष्यात येत्या दोन दिवसात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 16 जून पासून या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो. चंद्र आणि राहू ग्रहाची युती या लोकांच्या मानसिक अस्थिरतेचे कारण ठरू शकतो.

चिडचिडेपणा, भावनिक ताण, अचानक करिअरमध्ये बदल आणि कौटुंबिक गैरसमज अशा काही संकटांमुळे हे लोक मानसिक तणावात राहू शकतात. यामुळे या लोकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी योग्य काळजी घ्यायला हवी. 

वृषभ : या राशीच्या लोकांनाही आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिष तज्ञ असं म्हणत आहेत की येत्या दोन दिवसानंतर या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो.

चंद्र आणि राहू ग्रहाच्या युतीमुळे या लोकांचे वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. तसेच, शेअर बाजार, क्रिप्टो किंवा इतर धोकादायक गुंतवणुकीत नुकसान होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!