भावनिक पण जबरदस्त बिझनेस माइंड घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकच्या मुली! जाणून घ्या त्यांच्या यशामागील गुपित

Published on -

अंकशास्त्रानुसार प्रत्येक संख्येच्या मागे एक विशिष्ट उर्जा आणि व्यक्तिमत्त्व असतं. त्यात ‘2’ मूलांक असलेल्या मुलींचं व्यक्तिमत्त्व खूपच आकर्षक आणि गूढ असतं. चंद्राच्या प्रभावाखाली असलेल्या या मुली सौंदर्य, भावुकता आणि कोमलतेचा संगम असतात. त्या कुठल्याही गर्दीत सहज उठून दिसतात.

ज्यांचा जन्म महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला होतो, त्यांच्या जीवनावर चंद्राचा प्रभाव असतो. त्यामुळे या मुली फारशा गोंधळ न घालता स्वतःच्या स्वप्नांच्या विश्वात रमलेल्याच असतात. त्यांना ब्रँडेड कपडे, सौंदर्यप्रसाधनं, आरामदायक घर, गाड्या आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनशैली आवडते. पण याचवेळी त्या आर्थिकदृष्ट्या खूप हुशार असतात. त्या गरजेपेक्षा जास्त खर्च करत नाहीत, बचत आणि गुंतवणुकीवर भर देतात. सोनं, चांदी, प्रॉपर्टी किंवा स्टॉक्स याबाबत त्यांना चांगली समज असते.

मूलांक 2 चा स्वभाव आणि करिअर

या मुलींचा स्वभाव कलात्मक आणि सर्जनशील असतो. म्हणूनच त्या मीडिया, शिक्षण, चित्रकला, डिझायनिंग किंवा सामाजिक कार्यात सहजपणे यश मिळवतात. त्या फक्त मेहनतीच नसतात, तर त्यांचं नशीबही त्यांच्यासोबत असतं. त्यामुळे त्या व्यवसायातही मोठं नाव कमावतात आणि करोडो रुपयांची उलाढाल सहज करतात. त्यांची विचार करण्याची शैलीही फार खोल आणि भक्कम असते.

प्रेमाच्या बाबतीत मात्र त्या फारच भावनिक असतात. ज्या पद्धतीनं त्या जोडीदारावर प्रेम करतात, ते निःस्वार्थ आणि समर्पित असतं. पण कधी कधी त्याच भावनांमुळे त्यांना प्रेमात फटका बसतो. फसवणूक झाली तरी त्या खचून जात नाहीत, उलट त्यातून शिकून पुढच्या आयुष्यात अधिक मजबूतपणे उभ्या राहतात. त्या आपल्या जोडीदारासाठी एक परिपूर्ण जीवनसाथी ठरतात, ज्या घरात सुख, समाधान आणि शांती घेऊन येतात.

तरीही या मुलींच्या स्वभावात एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे,त्या मूडी असतात. बाहेरून शांत आणि सौम्य वाटणाऱ्या या मुली एखाद्या क्षणी अचानक भावनिक प्रतिक्रिया देतात. त्यांच्या मनाशी खेळल्यास किंवा त्यांच्यावर अविश्वास दाखवल्यास त्या सहज विस्फोट करू शकतात. चंद्राच्या प्रभावामुळे त्या भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील असतात, ज्यामुळे त्यांना तणाव अधिक जाणवतो.

करा ‘हे’ उपाय

अशा मुलींनी मानसिक स्थैर्य राखण्यासाठी काही उपाय करावेत. सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करणं, ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करणं, चांदीची अंगठी घालणं, दररोज ध्यान करणं किंवा योग करणे हे उपाय त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. हे उपाय केल्याने त्यांच्या भावनिक अस्थिरतेवर नियंत्रण मिळू शकतं आणि जीवन अधिक स्थिरतेने चालू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!