रेल्वे स्टेशनवर थांबत नाही, प्रवासी चढत-उतरत नाहीत; तरीही रोज विकली जातात तिकिटे! उत्तर प्रदेशमधील ‘या’ स्टेशनची कहाणी तुम्हाला थक्क करेल

Published on -

रेल्वेच्या धकाधकीच्या जगात जिथे प्रवासाशिवाय तिकिट खरेदी करण्याची कल्पनाही कठीण वाटते, तिथे उत्तर प्रदेशमधील एक लहानसं स्टेशन दयालपूर आज एक वेगळीच कहाणी सांगतं. इथे गाड्या थांबत नाहीत, प्रवासी चढत-उतरत नाहीत, पण तरीही स्थानिक लोक दररोज तिकिटे खरेदी करतात. ही फक्त तिकीट नाही, तर त्यांचं या स्थानकाशी असलेलं भावनिक नातं आहे.

दयालपूर रेल्वे स्थानक

दयालपूर रेल्वे स्थानकाची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं हे स्थानक एकेकाळी गजबजलेलं होतं. अनेक गाड्यांचा थांबा इथे असायचा आणि गावकऱ्यांसाठी हे स्थानक प्रवासाचा एक मोठा दुवा होतं. पण काळानुसार परिस्थिती बदलली. प्रवाशांची संख्या कमी झाली आणि 2006 मध्ये, रेल्वे प्रशासनाने आर्थिक तुटीचा आधार देत हे स्थानक बंद केलं.

प्रवाशांची वर्दळ थांबली खरी, पण गावकऱ्यांची या स्थानकाशी नाळ कधीच तुटली नाही. त्यांनी हे स्थानक फक्त एक प्रवासाचे ठिकाण म्हणून नाही, तर आपल्या गावाचा मान, आपल्या आठवणींचा भाग मानला होता. 2020 मध्ये जेव्हा स्थानक पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं, तेव्हा गावकऱ्यांनी एकमताने ठरवलं आता हे स्टेशन पुन्हा बंद होऊ द्यायचं नाही. मग काय, त्यांनी रोज तिकिटं खरेदी करायला सुरुवात केलीप्रवास न करताच, केवळ स्टेशन सुरू राहावं म्हणून.

सध्या एकच ट्रेन थांबते-

आज दयालपूरमधील लोक दररोज सुमारे 700 रुपयांची तिकिटं घेतात. ही तिकिटं कुणालाही कुठे नेत नाहीत, पण एक भावना जपतात, की त्यांच्या गावाचं स्टेशन पुन्हा एकदा विसरलं जाऊ नये. सध्या फक्त एकच ट्रेन इथे थांबते, तीही फारशी वापरली जात नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!