महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी धक्कादायक बातमी! राज्यातील 7 हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, कारण काय ?

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातील जवळपास सात हजाराहून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील मराठी शाळा संकटात आल्या आहेत. राज्यातील मराठी शाळांचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत चालले आहे आणि ही बाब मराठी अस्मितेसाठी मोठी धोक्याची घंटा बनत चालली आहे.

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवले जात आहे. पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांमधून शिकवण्यासाठी आग्रही बनत चालले आहेत. दरम्यान, इंग्रजी शिक्षणाकडे वाढलेला कल, पालकांची मानसिकता आणि सरकारी दुर्लक्षामुळे राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत.

अलीकडील अहवालानुसार, राज्यभरात शेकडोच्या संख्येने मराठी शाळांचे दरवाजे बंद करावे लागले आहेत. अशातच आता राज्यातील मराठी शाळांबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.

हजारो शाळा बंद होण्याच्या मार्गावर 

महाराष्ट्राची राज्य राजधानी राजधानी मुंबईत मराठी शाळांचा टक्का घटत आहे. गेल्या 13 वर्षांत तर महापालिकेच्या 131 मराठी शाळा बंद झाल्या आहेत. शाळाच नाही तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष 2012-13 ते 2024-25 या 13 वर्षांत महापालिकेच्या शेकडो मराठी शाळा बंद झाल्या आहेत. 13 वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेअंतर्गत 385 मराठी शाळा होत्या,

मात्र 2024-25 या आर्थिक वर्षात मराठी शाळांची संख्या 254 पर्यंत खाली आली आहे. मुंबई महापालिकेतील मराठी शाळांप्रमाणेच राज्यातील इतरही भागांमधील मराठी शाळांचे हाल पाहायला मिळत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षाही कमी झाली आहे. शिक्षण विभागाच्या जून 2025 च्या अहवालानुसार, सध्या महाराष्ट्रात सुमारे 7,420 सरकारी मराठी शाळा अशा आहेत जिथे विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षा कमी आहे.

तर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शिक्षक आणि शिक्षण सेवकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

या अहवालानुसार राज्यातील सात हजाराहून अधिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारकडून मराठी शाळांना चालना देण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे. अन्यथा भविष्यात मातृभाषेतील शिक्षणच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!