मोठी बातमी ! आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून 65 बसेस सोडल्या जाणार, वाचा सविस्तर

पुढील महिन्यात आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांचा मेळा सजणारा आहे. दरम्यान आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी असती महामंडळाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on -

Maharashtra News : राज्यातील एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आषाढी एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खर तर दरवर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.

यंदाही आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे आणि याच भाविकांच्या अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आषाढी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडून भाविकांची आर्थिक फसवणूक केली जाते. भाविकांकडून अव्वाचे-सव्वा भाडे वसूल केले जाते. दरम्यान, याच भाडेवाढीवर लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष एसटी बस चालवण्याची योजना आखली आहे.

नागपूर विभागातून सुरु होणार नवीन बसेस

यंदा 2 जुलै ते 13 जुलै 2025 दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागपूर विभागातून थेट पंढरपूरला जाणाऱ्या 65 विशेष बसेस चालवल्या जाणार आहेत. महत्त्वाची बाब अशी की मागणी वाढल्यास अधिक बसेस सोडण्याचीही एसटीची तयारी आहे.

एवढेच नाही तर एसटी महामंडळाने कोणत्याही गावातून 40 किंवा त्याहून अधिक भाविकांनी एकत्रितपणे मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरला जाणारी एसटी बसची सेवा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.

पण यासाठी संबंधित आगाराशी संपर्क साधावा लागणार आहे. एसटी महामंडळाने ज्या अतिरिक्त कसे चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्या बसेसमध्ये शासनाच्या सवलती लागू राहणार आहेत. 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, तर 65 ते 75 व महिलांसाठी 50% सवलत लागू राहणार आहे. 

कोणत्या आगारातून किती बसेस सोडल्या जाणार ? 

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागातील घाटरोड आणि गणेशपेठमधून प्रत्येकी 13 बसेस सोडल्या जाणार आहेत.  उमरेडमधून 5, काटोलमधून 7, रामटेक व सावनेरमधून प्रत्येकी 7, इमामवाडा आगारातून 6 आणि वर्धमाननगरहून 7 बसेस सोडण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षीच्या आषाढी एकादशी मध्ये फक्त 40 विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. यंदा मात्र गाड्यांची संख्या 65 पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि यामुळे साहजिकच भाविकांना मोठा दिलासा मिळाला अशी आशा व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!