नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. गडाख पुढे म्हणाले, आ. मुरकुटे यांनी देवगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसविले.

आ. मुरकुटे यांच्या पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे न दिल्याने त्यांच्या मुलींची लग्न होऊ शकली नाही. आ. मुरकुटे म्हणतात, आमरातईत बसून विकास होत नाही, मग आ. मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटी’मध्ये बसून कोणाचा विकास करतात?
यावेळी अनेकांची भाषणे झाली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत गाडीच्या काचा फोडण्याचे पाप कोणी केले, याचा खुलासा काही कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान केला.
- महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचाऱ्यांना ‘या’ तारखेला मिळणार 3 टक्के डीए वाढीचा लाभ, वाचा सविस्तर
- Mumbai Railway : मुंबईकरांसाठी खुशखबर ! आणखी एक सुपरफास्ट एक्सप्रेस; कोणकोणत्या स्टेशनंवर थांबा घेणार ?
- Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीवर मिळतोय मोठा डिस्काउंट ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार सिक्रेट ऑफर्स
- महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! 100 मिनिटाचा प्रवास फक्त 60 मिनिटात; कसा असणार रूट ?
- लाडक्या बहिणींसाठी CM फडणवीस यांची मोठी घोषणा ! योजनेचा ऑक्टोबर हप्ता कधी मिळणार ? वाचा…













