नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. गडाख पुढे म्हणाले, आ. मुरकुटे यांनी देवगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसविले.

आ. मुरकुटे यांच्या पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे न दिल्याने त्यांच्या मुलींची लग्न होऊ शकली नाही. आ. मुरकुटे म्हणतात, आमरातईत बसून विकास होत नाही, मग आ. मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटी’मध्ये बसून कोणाचा विकास करतात?
यावेळी अनेकांची भाषणे झाली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत गाडीच्या काचा फोडण्याचे पाप कोणी केले, याचा खुलासा काही कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान केला.
- सरकारी कर्मचाऱ्यांना २०२८ मध्ये लागू होणार नवीन आठवा वेतन आयोग ! कर्मचाऱ्यांना किती थकबाकी मिळणार?
- 2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?
- गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! शेअर मार्केट 15 दिवस बंद राहणार, NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी
- लाडक्या बहिणींना पुन्हा मोठा दिलासा ! ई – केवायसी प्रक्रियाबाबत शासनाचा सर्वात मोठा निर्णय, आता….
- सरकार ‘या’ समाजातील लाडक्या बहिणींना देणार 50 हजार रुपयांचे कर्ज ! कशी आहे सरकारची नवीन योजना?













