नेवासे :- राजकारणात सत्ताप्राप्तीनंतर गडाख, तनपुरे, घुले आदींना बंगले बांधायला दहा पंधरा वर्षे लागली. मात्र आ. बाळासाहेब मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षातच सर्वसुविधांनीयुक्त असा प्रशस्त बंगला बांधून ‘परिवर्तन’ केले, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राम मंदीरात पार पडलेल्या ‘संवाद’ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अनेक युवकांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षात प्रवेश केला. गडाख पुढे म्हणाले, आ. मुरकुटे यांनी देवगावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसविले.

आ. मुरकुटे यांच्या पत्नी संचालिका असलेल्या पतसंस्थेने ठेवीदारांना पैसे न दिल्याने त्यांच्या मुलींची लग्न होऊ शकली नाही. आ. मुरकुटे म्हणतात, आमरातईत बसून विकास होत नाही, मग आ. मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटी’मध्ये बसून कोणाचा विकास करतात?
यावेळी अनेकांची भाषणे झाली. विधानसभेच्या मागील निवडणुकीत गाडीच्या काचा फोडण्याचे पाप कोणी केले, याचा खुलासा काही कार्यकर्त्यांनी भाषणादरम्यान केला.
- फेब्रुवारीत ग्रहांची चाल बदलणार; वृषभ, सिंह आणि कन्या राशींवर कसा असेल परिणाम?
- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी योगी सरकारचे कठोर पाऊल; संपत्ती जाहीर न करणाऱ्या 68 हजार कर्मचाऱ्यांचा पगार रोखणार
- लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय; केवायसी केलेल्या महिलांची होणार प्रत्यक्ष पडताळणी, काहींचा हप्ता कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता
- नागपूरकरांसाठी पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा नवा अध्याय; १४ फेब्रुवारीला PM ई-बस सेवेचा शुभारंभ
- 10 ग्रॅम सोन्यावर किती कर्ज मिळतं? व्याज, EMI आणि नियमांचा ‘ए टू झेड’ हिशोब













