Cable Bus : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी भारतातील वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. गडकरी यांनी देशात प्रदूषणमुक्त वाहतूक वाढवण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरचा अवलंब कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
पुढील पाच वर्षांत जैवइंधनाचा वापर 50% पर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच मंत्री गडकरी यांनी ऑटोमोबाईल उद्योगाला पर्यायी इंधनांवरील संशोधनाला गती देण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. दरम्यान आता गडकरी यांनी पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी देशात रोपवे केबल बस चालवल्या जातील अशी घोषणा केली आहे.

कोणत्या शहरात सुरू होणार पहिली रोपवे केबल बस
गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, केबल बस नेटवर्कमध्ये मर्यादित अंतरावर स्टेशन बांधले जातील, जिथून लोक त्यात चढू आणि उतरू शकतील. महत्वाची बाब अशी की हे संपूर्ण नेटवर्क पर्यावरण पूरक राहणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक अर्थातच बॅटरीवर चालणारे राहणार आहे.
दरम्यान, देशातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच रोपवे केबल बसेस सुरू केल्या जाणार आहेत. या बस बॅटरीवर चालतील, पर्यावरणपूरक असतील आणि त्यांच्या ऑपरेशनमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होईल असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
गडकरी यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची घोषणा केली. ते म्हणालेत की देशात आतापर्यंत 60 हुन अधिक रुपये बस प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच देशातील प्रमुख शहरांमध्ये लवकरच हे प्रकल्प आपल्याला साकारताना दिसणार आहेत.
तर 360 नवीन प्रस्ताव सरकारकडे आले आहेत. त्यामुळे यापैकी अनेक प्रस्तावांवर सरकारकडून सकारात्मक विचार होण्याची सुद्धा शक्यता आहे. नक्कीच, रोपवे केबल बस सुरू झाली तर देशातील वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे.
दुसरीकडे रोपवे केबल बस प्रकल्पासाठी अमेरिका, युरोप आणि जपानमधून 13 तांत्रिक प्रस्तावही मिळालेले आहेत. म्हणजेच लवकरच हा प्रकल्प सत्यात उतरवला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की देशातील पहिला रोपवे केबल बस प्रकल्प राजधानी दिल्लीत विकसित होणार आहे.
म्हणजे राजधानी दिल्लीत पहिली रोपवे केबल बस धावताना दिसणार आहे. यानंतर मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये देखील ही बस सुरू होऊ शकते असा विश्वास व्यक्त होतोय.
या कंपन्या बनवणार केबल बस
या प्रस्तावित वातानुकूलित केबल बसमध्ये 135 आसने राहणार आहेत. म्हणजेच 135 लोकांना यामधून प्रवास करता येणार आहे. महत्त्वाची बाब अशी की केबल बसेस मधून प्रवास करतांना प्रवाशांना चहा पाण्याची सुद्धा सोय करून दिली जाणार आहे.
म्हणजेच या बसेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांना हवेतच चहापाणी करता येणार आहे. या बसेसचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे 30 सेकंद मध्ये या बसे चार्ज होऊ शकतात. यामध्ये प्रवाशांना अगदीच प्रीमियम दर्जाचा अनुभव मिळणार आहे.
हिताची आणि सीमेन्ससारख्या कंपनीज या प्रकल्पासाठी रोपवे केबल बस तयार करणार असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आहे. ही योजना स्वच्छ, सुरक्षित आणि गतिशील वाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असा विश्वास आता जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.