मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वे कडून नव्या एक्सप्रेस ट्रेनची घोषणा, ‘या’ 19 रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस

महाराष्ट्रहून गुजरात आणि मध्य प्रदेशला जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईवरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on -

Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे कडून एका नव्या एक्सप्रेस ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेने मुंबई येथील वांद्रे टर्मिनस ते वीरंगणा लक्ष्मीबाई झांसी यादरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.

दरम्यान आता आपण पश्चिम रेल्वेकडून सुरु करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबा घेणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक ?

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस-वीरंगणा लक्ष्मीबाई झांसी सुपरफास्ट स्पेशल (ट्रेन क्रमांक 02200) पाच जुलै 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर शनिवारी मुंबई येथील वांद्रे टर्मिनस येथून सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी मुंबईतून पाच वाजून दहा मिनिटांनी सोडले जाईल आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजता विरंगणा लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 02199 म्हणजे वीरांगना लक्ष्मीबाई झांसी-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 3 जुलै ते 25 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर गुरुवारी 16.50 वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झांसी रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी 16.10 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार आहे.

कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन 

पश्चिम रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही विशेष गाडी या मार्गावरील बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा,

गोध्रा, दाहोद, रतलाम, नागदा, उज्जैन, माकसी, बिओरा राजगढ, चाचौरा बिनागंज, रुथियाई, गुना, शिवपुरी, ग्वाल्हेर, डबरा आणि दतिया या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

नक्कीच या विशेष एक्सप्रेस ट्रेन मुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईहून गुजरात आणि मध्यप्रदेश ला जाणाऱ्या नागरिकांसाठी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन अधिक लाभाची ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!