शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जाणार ! तयार होतोय आणखी एक नवा मार्ग, कसा असणार नवा मार्ग ? 

राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी दिली आहे. नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी मिळाली असल्याने या प्रकल्पाला गती प्राप्त होणार असून याच महामार्ग प्रकल्पाबाबत आता एक नवीन माहिती हाती आली आहे.

Updated on -

Maharashtra New Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले

असून या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे आता नागपूर ते मुंबई हा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण करता येणे शक्य होत आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला देखील राज्य सरकारकडून गती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प साठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाकरिता आणि आखणीसाठी 20,000 कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब अशी की सदर प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाकडूनच पूर्णत्वास नेला जाणार आहे. दरम्यान याच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.

https://twitter.com/TheINIofficial/status/1938793751872422354?t=VBTgiN7DaX4PjFB-SnHkUg&s=19

समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग एकमेकांना जोडले जाणार 

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रस्तावित करण्यात आलेला शक्तिपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्गाचा विस्तारित टप्पा म्हणजेच जालना-नांदेड एक्सप्रेस वे परभणी शहराबाहेर एकमेकांना जोडले जाणार आहेत. परभणी शहराच्या अगदी बाहेरच हे दोन्ही महामार्ग एकमेकांना इंटरसेक्ट होतील.

म्हणजे भविष्यात मराठवाड्यातील परभणी शहराला दोन नव्या महामार्गांची भेट मिळणार आहे. या दोन प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पामुळे परभणी शहरासहित जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असल्याचा आशावाद तज्ञांकडून व्यक्त केला जातोय.

खरेतर, जालना-नांदेड एक्सप्रेसवेचे बांधकाम सध्या अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ते पुढील 30 महिन्यांत पूर्ण होईल अशी आशा सुद्धा. दरम्यान हाच प्रवेश नियंत्रित महामार्ग शक्तीपीठ एक्सप्रेसवेला समृद्धी एक्सप्रेसवेशी सुद्धा जोडणार आहे. 

शक्तीपीठ महामार्ग कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार?

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा महामार्ग प्रकल्प राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. मात्र या महामार्ग प्रकल्पाला काही जिल्ह्यांमध्ये तीव्र विरोध केला जातोय. तथापि सरकारने या प्रकल्पाच्या भूसंपादनाला मंजुरी दिलेली आहे.   

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!