मुंबई: लोकसभेत वेगळे लढले असताना आम्ही अमुक जागा देतो असे सांगून टीव्ही, वर्तमानपत्रात चर्चेत राहून प्रकाश आंबेडकर जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोमवारी केला.
आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, असे सांगितले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक म्हणाले, आंबेडकर हे लोकसभेत वेगळे लढले होते. त्यांना आमच्याशी आघाडी नकोच आहे.

आता विधानसभेलाही त्यांना वेगळेच लढायचे आहे. वंचितमुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेना-भाजपला होत असल्याचे राज्यातील जनतेला कळून चुकले आहे. जनतेने लोकसभेत जी चूक केली ती पुन्हा विधानसभेत करणार नाहीत.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी विधानसभेत मित्रपक्षांना सोबत घेऊन ताकदीने लढवणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
- 2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?
- गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! शेअर मार्केट 15 दिवस बंद राहणार, NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी
- लाडक्या बहिणींना पुन्हा मोठा दिलासा ! ई – केवायसी प्रक्रियाबाबत शासनाचा सर्वात मोठा निर्णय, आता….
- सरकार ‘या’ समाजातील लाडक्या बहिणींना देणार 50 हजार रुपयांचे कर्ज ! कशी आहे सरकारची नवीन योजना?
- दुष्काळात तेरावा महिना ! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा झाली मोठी वाढ, नवीन रेट लगेच चेक करा













