राहुरी :- शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व जाहीर सभा होणार असून, यावेळी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा व जाहीर सभेबाबत माहिती देताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, राहुरी मतदारसंघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून निळवंडे कालवा, रस्ते, पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे.

त्यांचा हा दौरा यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. राहुरी येथे शुकवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता मुख्यमंर्त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असून,
महाजनादेश यात्रा नगर-मनमाड रस्त्याने राहुरी येथील वाय.एम.सी. ग्राऊंड येथे पोहोचल्यानंतर जाहीर सभा होणार आहे, असे आ. कर्डिले यांनी सांगून यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
- अरे बापरे! भारताची लोकसंख्या पोहोचली १४६ कोटींवर, चीनला टाकलं मागे; मात्र मुलं जन्माला घालण्याचा दर झाला कमी
- फक्त दोन दिवसात 65 पट सबस्क्राईब झालेला IPO… जाणून घ्या काय आहे खास?
- पृथ्वीचा विनाश सुरू? भारतात स्थिती गंभीर! हवामान बदलामुळे देशात 3.2 कोटी लोक बेघर, पुढील काळात…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार ? वाचा..
- अहिल्यानगर जिल्ह्यातील नऊ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या एसपी सोमनाथ घार्गे यांनी केल्या बदल्या