अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- विवाहपूर्वीच तिला अपशकुनी ठरवत, विवाहास नकार दिल्याने, पैसे व दागिनेही परत घेऊन फसवणूक केल्याने तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दोनही कुटुंबाच्या संमतीने साखरपुडा झाला, दागिन्यांची देवानघेवाण झाली मात्र याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वर पक्षाकडील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
भारती भास्कर सांगळे वय २६ रा. हंगेवाडी ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील हंगेवाडी येथील भारती भास्कर सांगळे या तरुणीचा चार महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. या दोनही कुटुंबात बोलणी होऊन त्यांचा हंगेवाडी येथे साखरपुडा झाला होता.
दोनही कुटुंबाच्या बोलणीतून ठरल्याप्रमाणे आरोपीला एक तोळ्याची सोन्याची अंगठी व दोन लाख रुपये विश्वासाने देण्यात आले होते. वरपक्षाने देखील दोन तोळे वजनाचे नेकलेस व कानाचे दागिने दिले होते. त्यानंतर आरोपीने भरतीला दि दागिने व्यवस्थित करून देतो असे सांगून परत घेऊन गेला.
१ नोव्हेंबर रोजी रविवारी मयत भारती व तिचा भाऊ किरण अपशकुनी असल्याचे सांगत वरपक्षाने विवाह मोडला. तसेच सांगळे कुटुंबियांना शिवीगाळ व दमदाटी केली. घेतलेले पैसे व दागिने परत देण्यास नकार दिला.
या घटनेमुळे भारती नैराश्यात गेली आणि टोकाची भूमिका घेत आत्महत्या केली. याप्रकरणी किरण भास्कर सांगळे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved