बंगलूरु : डोकेदुखी असह्य झाल्याने ती शमवण्यासाठी १५ गोळ्या खाल्ल्याने गृहीणीचा मृत्यू झाल्याची घटना बंगलूरुत घडली आहे. या गोळ्यांमुळे तीने दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होती. मुनाप्पा हा पत्नी सुमन्न्मा आणि मुलीसोबत अनेकल पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहातो.
सुमन्न्माला डोकेदुखीचा त्रास आहे. तिच्यावर उपचार सुरु होेते. डोकेदुखी असल्यास वेदनाशमक गोळ्या तिला डॉक्टरने दिल्या होत्या. चार दिवसांपूर्वी तिला असह्य डोकेदुखी जाणवू लागली. तीने एकापाठोपाठ एक अशा १५ गोळ्या खाल्ल्या.

परंतू त्यामुळे डोकेदुखी थांबण्याऐवजी ती बेशुध्द पडली. मुलगी शोभाने तिला दवाखान्यात नेले. तिथून तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झगडा दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे.
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा
- ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीवर सरकारची भूमिका स्पष्ट; ७,५०० रुपयांचा प्रस्ताव नसल्याचे राज्यसभेत जाहीर
- STT वाढीच्या धक्क्यानंतर शेअर बाजार सावरला; मात्र गुंतवणूकदार अजूनही सावध













